Hawamaan Andaaz : आज सकाळपासूनच आभाळ भरून आलंय. सूर्यदर्शन नाही, फक्त काळसर ढग आणि एकदम दमट वातावरण. काही ठिकाणी थेट विजांचा कडकडाट सुरू आहे, तर कुठे जोरदार वाऱ्यांनी झाडं झुलायला लागलीत. कोकण, घाटमाथा, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, जळगाव, धुळे, नंदुरबारसह तब्बल २२ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे गावात आणि शेतात काम करताना विशेष काळजी घ्या, असं प्रशासनाचं आवाहन आहे.Hawamaan Andaaz
कालपासून अनेक भागात पावसाची झड लागलेलीच आहे. काही ठिकाणी तर इतका पाऊस झालाय की वीज गेली, मोबाइल रेंज गायब, रस्त्यावर चिखल साचलेला – गावात काही कामं थांबलेली आहेत. आता मे महिना संपत आला तरी उकाडा काही कमी नव्हता, पण या पावसामुळे थोडाफार गारवा जाणवतोय. तरी दमटपणा मात्र जीव हैराण करून टाकतोय.
वादळी वारे, विजा अन् मुसळधार सरी
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज काही भागांत ४० किमी वेगाने वारे वाहतील. विजा चमकतील, वादळ उठेल आणि पावसाचा जोर कमालीचा असेल. त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं घरातच राहा. शेतकऱ्यांनी उघड्यावर ठेवलेलं सामान झाकावं, बैलांचं, गुरांचं रक्षण करावं, अनावश्यक प्रवास टाळावा.
कोणकोणते जिल्हे धोक्याच्या झोनमध्ये?
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, धाराशिव, हिंगोली, जालना, गडचिरोली, चंद्रपूर अशा २२ जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट, तर काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
विदर्भात ढगाळ वातावरण, पण पावसाची वाट नाही
नागपूर, वाशीम, यवतमाळ, गोंदिया – या भागात आज ढग दाटून येतील, पण पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. उलट उकाडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिकडच्या लोकांनी अजूनही उन्हाच्या त्रासासाठी तयारीत राहावं.
मान्सून जवळ आलाय शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!
हवामान विभागानं सांगितलंय की २५ ते २७ मे दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. मग जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबई-कोकणात, आणि दुसऱ्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पाऊस धडकणार! याचा अर्थ, खरीप हंगाम जवळ आलाय. पेरणीसाठी शेतीची मशागत करणं, बी-बियाणं तयार ठेवणं हे सगळं आता वेळेत करायला हवं.
मे मध्येच थंडीचा अनुभव
आता पर्यंत ‘मे’ म्हणजे उन्हाचा कहर, पण यंदा मात्र वेळेआधीच पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात थोडा गारवा आलाय. उष्णतेचं प्रमाण कमी झालंय, तापमान घसरलाय आणि हवा गारसर वाटतेय. अर्थात काही भागात दमट हवामानामुळे अंग घामाघूम होतोयच.
हे पण वाचा | या योजनेअंतर्गत मिळणार 10 लाख रुपये! अर्ज प्रक्रिया काय