Heavy Rain in Maharashtra :- राज्यात पुन्हा एकदा मान्सूनच्या हालचालींना वेग आला असून, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता असून, अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अलर्टमुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.Heavy Rain in Maharashtra
हे पण वाचा :– महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला! पुढील आठवडाभर या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस…
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. उन्हाचा ताप आणि उकाडा यामुळे लोक त्रस्त झाले होते. पण आता पुन्हा वातावरणात आर्द्रता वाढली असून, आकाश ढगांनी व्यापलेलं आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज शंभर टक्के खरा ठरतोय, असं अनेक जिल्ह्यांमधून येणाऱ्या बातम्यांवरून दिसून येतंय. सकाळी ऊन पडलं तरी दुपारनंतर आकाशात विजा चमकायला लागतात आणि वाऱ्याचा वेग वाढतोय. यामुळे अनेक भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत.
हे पण वाचा :– महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला! पुढील आठवडाभर या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी या कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यांसह पुणे, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, धुळे अशा मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, हिंगोली, जालना, परभणी हे जिल्हे तर विदर्भात नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, गोंदिया, भंडारा, वाशिम याठिकाणी हवामान खात्याने विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सध्या गुजरातच्या वायव्य भागात आणि बांगलादेशच्या उत्तरेकडील भागात चक्रीय स्थिती निर्माण झाली असून, त्याचा परिणाम थेट महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसतोय. या साखळी स्वरूपाच्या हवामान बदलामुळेच राज्यात पुन्हा पावसाचं आगमन होतंय. अनेक भागांत गुरुवारपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता असून, घाटमाथ्याच्या परिसरात जोर अधिक राहणार आहे.
हे पण वाचा :– महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला! पुढील आठवडाभर या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस
शहरांमध्ये हा पाऊस वाहतुकीच्या दृष्टीने अडथळा निर्माण करू शकतो, पण ग्रामीण भागात मात्र या पावसाची वाटच शेतकरी लावून बसलेत. काही ठिकाणी पेरण्यांची तयारी सुरू आहे, तर काही शेतकऱ्यांनी बी पेरलीत, आता या पावसाच्या पाण्यावर त्यांचं सगळं अवलंबून आहे. यामुळे आभाळ दाटलं की डोळे आभाळात, मनात प्रश्न ‘या सरी टिकतील का?’ पेरण्या सुरू होतील का?’ शेतकऱ्यांच्या या प्रश्नांची उत्तरं हवामान खात्याच्या अपडेटमध्ये सापडतात, पण तरीही निसर्गावरच भरोसा.
दिवसाच्या उत्तरार्धात म्हणजे दुपारनंतर आणि संध्याकाळच्या सुमारास पावसाचा जोर अधिक असतो. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, वीज चमकताना उघड्यावर न थांबता सुरक्षित जागा शोधावी. वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे होर्डिंग्स, झाडं पडण्याची शक्यता वाढते त्यामुळे प्रवास करताना अधिक खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
हे पण वाचा :– महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला! पुढील आठवडाभर या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस
सध्या राज्यात पाऊस म्हणजे केवळ पाणी नव्हे तो दिलासा आहे. उकाड्यानं हैराण झालेल्या शहरवासीयांना गारवा देणारा, आणि आपल्या शेतीचं भवितव्य डोळ्यांत ठेवून आभाळाकडे पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आशेचा शिडकाव करणारा. या पावसात मातीचा सुगंध आहे, श्रमांचं बळ आहे आणि महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याची गोडी आहे. म्हणूनच प्रत्येक सरीसोबत मनात प्रार्थना आहे “या सरी टिकून राहोत, आणि निसर्ग आपल्यावर कृपादृष्टी ठेवो.”
अशा अनेक नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा