Gold Rate Prediction | सध्या देशभर मध्ये गेला काही दिवसांपासून सोन्याचे भाव गगनाला भिडलेले होते. सोन खरेदी करावं का नाही? असा मोठा प्रश्न ग्राहकांसमोर उपस्थित राहिला होता. काही ग्राहकांच्या मनामधून भावना व्यक्त होतात की एकेकाळी 5000 रुपयांना मिळणारे एक ग्राम सोनं आज जवळपास 13 हजारांच्या घरांमध्ये पोहोचल आहे. सणासुदीचा काळ सुरू आहे आणि लग्नसराईजवळ येतेय, अशावेळी सोन विकत घ्यायचं की थांबायचं, हा सर्वात मोठा प्रश्न सध्या गुंतवणूकदारांना आणि लग्नसराई निमित्त सोने खरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना पडला आहे. काही जन म्हणतात थोडसं थांबलेलं बरं, खरंच सोन खरेदी करण्यासाठी थांबायचं का तज्ञ काय म्हणतात पहा Gold Rate Prediction
ANZ बँकेने आपला नवा अहवाल सादर केलेला आहे यामध्ये एक नवीन अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते सध्या सोनजरी महाग झाला असला तरी पुढच्या वर्षात म्हणजे 2026 मध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. यावर्षी सोने विक्रमी वाढ केली काही अहवालानुसार जवळपास 60% पर्यंत दर वाढले पण आता बाजार शांत होत चालला आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये डॉलर घसरला, आणि जागतिक तणाव वाढला, व्याजदर कमी झाले त्यामुळे सोन्यात लोकांनी पैसे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केले. पण तज्ञ म्हणतात, आता ही लाट खाली येणार आहे. सोनयावर्षीच्या अखेरीस $4,400 प्रति अंश पर्यंत जाऊ शकत. पण पुढच्या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत $4,200 च्या खाली घसरून शकत. म्हणजे ज्यांनी उंच दरात सोनं घेतलं त्यांना थोडी काळजी घ्यायला हवी.
मुंबई, पुणे, नाशिक, नको सारख्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोनाजवळपास एक लाख तीस हजार रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घरात आहे. पण खरंच ही घसरण झाले तर हे दर पुन्हा ₹1,10,000 च्या आसपास यायची शक्यता आहे. त्यामुळे सोना विकत घ्यायचं की ठेवायचा हा निर्णय विचार करूनच घ्या.
तज्ञ सांगतात की, राजकीय अस्थिरता, निवडणुकीचा काळ, युद्धजन्य परिस्थिती हे घटक पुन्हा वाढले तर सोन्याचे दर पुन्हा उंचावतील. पण जरा अमेरिकेची अर्थव्यवस्था स्थिर राहिली आणि डॉलर पुन्हा मजबूत झाला तर सोन्याच्या भावांना मोठा धक्का बसू शकतो.
सर्वसामान्य लहान गुंतवणूकदार किंवा 16 साठवणाऱ्या घरगुती महिलांसाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. का रस्व न फक्त दागिन नसतं, ते आपल्यासाठी संकटात साथ देणाऱ्या बँकाचा असतं. त्यामुळे भाव कमी झाले तरी घाबरायचं नाही, पण जास्तीच्या भावात विक्री करण्याचा मोहही टाळावा असा अर्थतज्ञांनी पष्ट केलेला आहे.