राज्यात कांद्याला चांगला बाजार भाव! शेतकऱ्यांना मोठा दिलासा; जाणून घ्या आहे कांदा दर…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Market Price: अवकाळी पावसामुळे बळीराजा दुहेरी संकटात असताना, पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतून कांद्याच्या दरात वाढ झाल्याची दिलासादायक बातमी येत आहे. रविवारी झालेल्या कांदा लिलावात चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिकिलो २२ रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काही प्रमाणात समाधान दिसत आहे.

बाजार समितीचे सभापती किसनराव रासकर आणि सचिव सुरेश आढाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी तब्बल ७,८७८ गोण्यांची आवक झाली होती. यापैकी, चांगल्या प्रतीच्या ७२ गोण्यांना हा विक्रमी २२ रुपये प्रति किलोचा भाव मिळाला. अर्थात, प्रतिक्विंटल १८०० रुपयांपेक्षा जास्त! ही वाढ अशा वेळी आली आहे, जेव्हा अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने कांद्याचे मोठे नुकसान केले आहे.

खरीप हंगामात संकटाची चाहूल: पंजाबराव डख यांचा अंदाज शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा?

भाव कसे मिळाले?

  • १ नंबर वक्कल: प्रतिक्विंटल १७०० ते १८०० रुपये.
  • २ नंबर: प्रतिक्विंटल १४०० ते १६०० रुपये.
  • ३ नंबर: प्रतिक्विंटल ९०० ते १३०० रुपये.
  • ४ नंबर: प्रतिक्विंटल २०० ते ८०० रुपये.

हे पण वाचा| लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा, जूनचे ₹1500 कधी मिळणार? मोठी अपडेट आली समोर..

याव्यतिरिक्त, गोल्टी कांद्यालाही १ हजार ते १४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाल्याचे माजी सभापती बाबासाहेब तरटे आणि उपसभापती किसनराव सुपेकर यांनी सांगितले. Onion Market Price

या वर्षी पावसाने सुरुवातीपासूनच धुमाकूळ घातल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा चाळीत सुरक्षित ठेवला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे साठवणुकीची सोय नाही, अशांनीच सध्या कांदा विक्रीला काढल्याचे चित्र आहे. यामुळे बाजारात चांगल्या प्रतीच्या कांद्याची आवक मर्यादित राहिल्याने दरात किंचितशी वाढ दिसून येत आहे.

हे पण वाचा| पुढील 48 तासात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता: ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी…

‘भिजलेला कांदा आणू नका,’ व्यापाऱ्यांचे आवाहन!

एकीकडे दरात वाढ झाल्याने दिलासा मिळत असला तरी, दुसरीकडे अवकाळी पावसाने भुई आरणी असलेल्या कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे भिजलेला कांदा बाजारात आणला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, व्यापारी संघटनेने शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. मारुती रेपाळे, चेतन भळगट, नंदकुमार देशमुख, किसनदादा गंधाडे आणि राजेंद्र तायडे या व्यापारी आणि संचालकांनी शेतकऱ्यांनी भिजलेला कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणू नये, असे कळकळीचे आवाहन केले आहे. भिजलेल्या कांद्यामुळे चांगल्या मालावरही परिणाम होतो आणि एकूणच बाजारातील दरावर नकारात्मक परिणाम होतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

एकंदरीत, पारनेर बाजार समितीतील ही दरवाढ कांदा उत्पादकांसाठी एक आशेचा किरण ठरली आहे. सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत हा थोडासा दिलासा शेतकऱ्यांना उभारी देणारा ठरेल अशी अपेक्षा आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “राज्यात कांद्याला चांगला बाजार भाव! शेतकऱ्यांना मोठा दिलासा; जाणून घ्या आहे कांदा दर…”

Leave a Comment