राज्यात पुढील पाच दिवस होणार अवकाळी पाऊस, तर काही ठिकाणी शेती पिकांचे झाले अतोनात नुकसान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather update | राज्याचे वातावरणामध्ये सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. गेल्या काही दिवसांमधून वातावरणामध्ये मला बदल झालेला दिसून येत आहे. कधी येऊन तर कधी पाऊस. दुपारी सूर्यदेव खूपच आग ओकत आहे. तर रात्री अवकाळी पावसाने (Untimely Rain) थैमान घातले आहे. Weather update

महाराष्ट्र मध्ये गेला काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे मोठे सत्र पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये अवकाळी पावसाने मोठे थैमान घातले असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. तर काही भागांमध्ये (Heat wave) उष्णतेची लाट देखील पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तापमान 43°c (Temperature 43°c)पर्यंत पोहोचले आहे. कधी ऊन तर रात्रीच्या ला पाऊस यामुळे नागरिक मोठ्या परेशान झालेले आहेत. व तेवढेच शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

पण तो हवामान विभागाच्या (Meteorological Department) माध्यमातून काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पावसाचे अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर त्याचप्रमाणे राज्यामध्ये भरपूर ठिकाणी अवकाळी पाऊस देखील पाहायला मिळाला आहे 17 एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी गारपीट झाल्याचे नोंद करण्यात आलेली आहे. यामुळे या या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून याशिवाय सांगली जिल्हा देखील मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झाली आहे.

सातारा मध्ये काही ठिकाणी तुफान वादळी वाऱ्यासह शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यामुळे पुढील काही दिवसांमध्ये आणखी अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज (Meteorologist) हवामान तज्ञांनी वर्तवलेला आहे.

भारतीय हवामान खात्याने केलेल्या अंदाजानुसार गेले काही दिवसांपासून राज्यामध्ये सातत्याने पावसाचे स्थिती कायम असून आणखी देखील पावसाची शक्यता वर्तनात आलेली आहे. अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळाची स्थिती तयार झालेली असून याचाच परिणाम महाराष्ट्रामध्ये दिसून असल्याचे चित्र आहे. तसेच गुजरात व कोकण तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये देखील उष्ण वारे (Hot Winds) वाहत आहेत.

अरबी समुद्रात प्रमाणेच बंगाल उपसागरात देखील महाराष्ट्राकडे उष्ण वारे येत आहेत. बंगालच्या उपसागरामधून छत्तीसगड तेलंगणा मार्गे महाराष्ट्रामध्ये विदर्भातील काही भागात अद्रक युक्त उष्ण वारे येत आहेत. हेच कारण आहे की राज्यामध्ये सध्या वादळीवारासह अवकळी पाऊस तसेच गुरुवारी व शुक्रवारी आणि शनिवारी देखील राज्यामध्ये काय भागात हलक्याचे मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे.

या जिल्ह्यांना अलर्ट

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 18 एप्रिल रोजी राज्यातील मराठवाडा विभागातील बीड व छत्रपती संभाजी नगर मध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच आज मराठवाड्यामध्ये लातूर धाराशिव नांदेड या ठिकाणी हलके ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीप्रमाणे शुक्रवारी आणि शनिवारी देखील विदर्भामध्ये काही ठिकाणी व मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या वादळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!