agriculture scheme maharashtra : सरकार नेहमीच शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवित आहे जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून या योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. भारत देश हा एक कृषीप्रधान देश आहे आपल्या देशामध्ये अनेक लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे भारतातील अनेक भागांमध्ये शेती व पशुपालन यावर अवलंबून आहे.agriculture scheme maharashtra
त्यामुळे सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमी अनेक योजना सुरू करीत आहे जेणेकरून शेतकरी आपला खर्च व गरजा पूर्ण करू शकतो. सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केले आहेत त्यामध्ये या पाच सरकारी योजना प्रत्येक शेतकऱ्याला माहिती पाहिजे जेणेकरून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन आपला उदरनिर्वाह करू शकतो व शेतकऱ्याला फायदा देखील होणार आहे.
चला तर पाहू कोणत्या आहेत 5 योजना ?
- मुद्रा आरोग्य कार्ड योजना
सरकारने शेतकऱ्यांसाठी मुद्रा आरोग्य कार्ड योजना 2015 सालि सुरू केली आहे, ज्या प्रकारे तुम्ही स्वतःची काळजी घेता त्याच प्रकारे तुम्ही तुमच्या जमिनीची काळजी घेता का ? यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे आज लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत या योजनेअंतर्गत शेतातील मातीची नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळांमध्ये पाठवले जातात व या मातीमध्ये कोणते पीक पिकू शकते याची संपूर्ण माहिती प्रयोगशाळा करून शेतकऱ्यांना दिली जाते, या कारमध्ये तुम्हाला मातीत काही कमतरता आहे का व मातीत काही आवश्यकता आहे का कोणती खते वापरायची व किती प्रमाणात वापरायची ही सर्व माहिती मिळते.
- प्रधानमंत्री पिक विमा योजना
सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण योजना म्हणजे प्रधानमंत्री पिक विमा योजना ज्याप्रकारे तुम्ही तुमचा विमा करता त्याच प्रकारे तुम्ही तुमच्या शेतातील पिकाचा विमा देखील करू शकता यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. जर कधी अतिवृष्टी , गारपीट, दुष्काळ, इतर कोणत्याही कारणामुळे तुमचे पिकाची नुकसान झाले तर तुम्ही भरलेल्या पिक विमा पासून तुमच्या पिकाचे नुकसान झालेले तुम्ही मिळू शकता.
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
शेतकऱ्यांना शेती पिकाला पाण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये या विषयाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरू करण्यात आली होती या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पावसाचे पाणी साठवण ठिबक सिंचन तंत्र तुषार सिंचन तंत्र आणि इतर पाणी बचत तंत्रे उपलब्ध करून दिले जातात ज्यामुळे शेतकरी या सर्व तंत्राचा वापर करून आपल्या शेतीला व्यवस्थित पाणी देतो.
- प्रधानमंत्री किसान सन्मान योजना
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारकडून चालवले जाणारे सर्वात मोठी योजना आहे. या योजनेमध्ये लहान आणि सीमांत शेतकरी पात्र आहेत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये रक्कम दिले जाते. ही रक्कम शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयाचे तीन हप्ते अशी एकूण सहा हजार रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाते. यामुळे शेतकरी आपल्या शेतीचा काही खर्च किंवा आपला घर खर्च देखील भागू शकतो.
- किसान क्रेडिट कार्ड योजना
सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मुख्य योजना सुरू केली आहे ती म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी वेळेत व कमी व्याज दरामध्ये कर्ज उपलब्ध होते. शेतकऱ्याला पाच वर्षासाठी तीन लाख रुपये आपत्कालीन कर्ज दिले जाते ज्याच्या मदतीने शेतकरी शेतीचे उपकरणे किंवा इतर गोष्टी पूर्ण करू शकतो. किसान क्रेडिट कार्ड योजना ही फक्त शेतकऱ्यांसाठी आहे याचबरोबर पशुपालनासाठी सरकारने पशु किसान क्रेडिट कार्ड योजना देखील सुरू केली आहे.