Heavy Rain : एकीकडे भाजून निघणारा उन्हाळा, तर दुसरीकडे ढगफुटीसारखा पाऊस; IMD या मोठा इशारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Heavy Rain | सध्या भारतात हवामानाचा अक्षरशः खेळ सुरू आहे. एका भागात सूर्य आग ओकत असताना, दुसऱ्या भागात आभाळ ढगांनी भरून मुसळधार पावसाची बरसात होते आहे. काही ठिकाणी इतकं तापमान वाढलंय की लोक रस्त्यावर पडून जातायत, तर काही ठिकाणी इतका पाऊस पडतोय की घरं-दारं वाहून जातायत. हा जो हवामानाचा झोंबारा आहे ना, तो खूपच गंभीर आहे. आता 22 एप्रिलपासून 25 एप्रिल दरम्यान देशातले तब्बल 20-25 राज्यं मुसळधार पावसाच्या तडाख्यात येणार आहेत. त्यात काही ठिकाणी वीजा कोसळणार, काही ठिकाणी वादळी वाऱ्यांचं थैमान पाहायला मिळणार आणि काही भागात तर ढगफुटी आणि बर्फवृष्टीसारखा प्रसंग घडणार आहे.Heavy Rain

कधी वळेल आभाळ, कुठे होईल मुसळधार बरसात, कुठे सोलापूरसारखा उकाडा?

हवामान विभागानं सांगितल्यानुसार, देशाच्या उत्तरेकडील राज्यं म्हणजे काश्मीर, हिमाचल, लडाखमध्ये सध्या ढगफुटी, वादळ आणि बर्फवृष्टीमुळे परिस्थिती हाताबाहेर चाललीय. काश्मीरमधल्या रामबन जिल्ह्यात ढगफुटीमुळे पूर आला, घरं वाहून गेली, रस्ते बंद झाले. लडाखमध्ये बर्फवृष्टीमुळे विजेची आणि वाहतुकीची व्यवस्था कोलमडलीय. शाळा बंद, दुकानं बंद आणि लोक घरातच अडकून पडलेत.

तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये उन्हाळ्याचा इतका प्रकोप आहे की पारा 44 अंशांवर गेला आहे. चंद्रपूरमध्ये तापमान 44.6 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय, तर राजस्थानातही सूर्य माणसाला भाजून काढतोय.

हवामान विभागाचा अलर्ट – पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाची मालिका सुरू

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 22 ते 25 एप्रिल दरम्यान खालील राज्यांमध्ये वादळी पावसाचा धोका आहे:

कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू – विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, हरयाणा – पावसासोबत ताशी 50-60 किमी वेगाने वारे

अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मेघालय – मुसळधार पाऊस आणि वादळ

गोवा, पाँडिचेरी, रायलसीमा, यानम – ढगाळ वातावरण आणि दुपारनंतर पावसाची शक्यता

हीटवेव्ह विरुद्ध मुसळधार पाऊस – एकाच देशात दोन टोकांचं हवामान

भारताच्या दक्षिण भागात तळपणारा सूर्य, उष्णतेच्या लाटा आणि उष्माघातानं लोकांचे जीव घेऊ पाहतोय, तिथेच काश्मीरमध्ये लोक अंगात स्वेटर घालून बर्फात अडकून पडलेत. हे निसर्गाचं असं विचित्र रूप खूप काही सांगून जातंय. हवामान बदलाचं हे दडपण आता शेती, आरोग्य आणि जीवनशैलीवरही मोठा परिणाम करतंय. एकीकडे शेतकरी पावसाच्या भरवश्यावर बी-बियाणं करतायत, तर दुसरीकडे पावसामुळे उगवलेलं पीक पाण्यात जातंय.

शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन

या विचित्र हवामानाचा फटका शेतकऱ्यांना जास्त बसू शकतो. विजा कोसळण्याची शक्यता असल्यामुळे शेतीकाम करताना सावध राहावं. उष्णतेच्या लाटेमुळे वृद्ध, लहान मुलं आणि गर्भवती महिलांनी सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान बाहेर जाणं टाळावं. शक्य असल्यास पाणी पित राहावं, डोक्यावर कापड ठेवावं.

हे नुसतं थांबणार नाही – पुढे मे महिना आणखी अंगार शिजवणार

एप्रिल महिन्यात असा हवामान बदल होतोय, म्हणजे मे महिन्यात तर कहर होणार हे नक्की. हवामान विभागाच्या मते, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही हीटवेव्हचे डोस वाढणार आहेत आणि काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची मालिका सुरू होईल. त्यामुळे अजून काही आठवड्यांसाठी उन्हाचा आणि पावसाचा हा डाव खेळ सुरूच राहील.

हे पण वाचा | या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; नवीन हवामान अंदाज

Leave a Comment