खरीप 2024 नुकसान भरपाई मंजूर : शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात, जिल्हानिहाय यादी आणि रक्कम तपासा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nuksan Bharpai : राज्यात यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीत कोसळलेल्या अवकाळी पावसाने शेतातील उभ्या पिकांचं कायाचं काय करून टाकलं. अनेक ठिकाणी पेरण्या पुन्हा कराव्या लागल्या, तर काही ठिकाणी पिकं मुळातच उगवली नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नुकसान भरपाईचे पैसे मंजूर झाले असून, जिल्हानिहाय रक्कमा निश्चित करण्यात आल्या आहेत. एकूण ३१७८ कोटींच्या नुकसान भरपाईतून १६२० कोटी रुपयांचे वाटप आतापर्यंत करण्यात आले असून उर्वरित १५५८ कोटींचे वाटप सुरु आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. Nuksan Bharpai

नाशिक विभागात १४ लाख ९८८ रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली असून यापैकी २ लाख ७६० रुपयांचे वाटप झाले आहे. उर्वरित १२ लाख २२७ रुपयांची रक्कम लवकरच वितरित होणार आहे. या विभागात नाशिकसह आसपासचे जिल्हे समाविष्ट आहेत. दुसरीकडे पुणे विभागात २८ लाख २९९ रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे, मात्र अद्याप वाटप सुरू झालेलं नाही. पुणे विभागात पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यांचा समावेश आहे.

कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून यापैकी २ लाख ५७ हजार रुपयांचे वाटप झाले आहे. बाकीचे १२ लाख ८१ हजार रुपयांचे वाटप लवकरच सुरू होईल. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना या जिल्ह्यांना मिळून ५६ लाख ४१८ रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी ११ लाख ८४६ रुपये वितरित झाले असून ४४ लाख रुपये वाटप होणे बाकी आहे.

लातूर विभाग हा सर्वाधिक नुकसान भरपाई मिळवणारा विभाग ठरला आहे. लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांसाठी एकूण १ कोटी ३३ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली असून त्यापैकी ९२ लाख रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे. ४० लाख रुपये अजूनही वाटपासाठी शिल्लक आहेत.

अमरावती विभागात बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ हे जिल्हे असून ६२ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. त्यात ३६ लाख रुपयांचे वाटप झाले असून उर्वरित २६ लाख रुपये वाटपासाठी बाकी आहेत. नागपूर विभागात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांसाठी २० लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली असून त्यापैकी १७ लाख रुपयांचे वाटप झाले आहे. फक्त २ लाख रुपयांचे वाटप उरले आहे.

शेतकऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यानुसार मंजूर रक्कम आणि वाटपाची स्थिती जाणून घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. नुकसान भरपाई थेट खात्यावर जमा होणार असल्याने आधार क्रमांक व बँक खाते माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. राज्य सरकारकडून लवकरच उर्वरित रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं असल्याचा विश्वास आता पुन्हा एकदा वाढला आहे. खरीप २०२४ मध्ये झालेलं नुकसान कुणालाच विसरता येणार नाही, पण या भरपाईतून थोडा दिलासा मिळेल, असं शेतकरी सांगत आहेत. पुढच्या हंगामासाठी शेतकरी नव्याने उभे राहणार असून, हवामान खात्याने दिलेल्या संकेतानुसार जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता असल्याने खरीप २०२५ ची तयारी आता जोरात सुरू होणार आहे.

हे पण वाचा |  शेतकऱ्यांना मोठी गिफ्ट !  नुकसान भरपाई राज्य सरकारची मंजुरी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अनुदान 

Leave a Comment