Heavy rain in Maharashtra :- गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली. एकीकडे पावसाने दम घेतलाय, पण आता पुन्हा एकदा मेघगर्जनेसह पावसाची रिपरिप ऐकू येणार आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 7 ते 10 जून आणि त्यानंतर 13 ते 18 जून दरम्यान जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपासाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे.
हे पण वाचा | पंजाबराव डख यांचा 2025 चा पावसाळी अंदाज: यंदाचा पाऊस देईल का शेतकऱ्यांच्या आशांना जीव?
डख म्हणाले, “यंदा जूनच्या शेवटपर्यंत महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्याची पेरणी रखडणार नाही. आतापर्यंत साधारण 350 मिमी पाऊस झालाय, त्यामुळे जमिनीमध्ये भरपूर ओल आहे. पुढील काही दिवसांत आणखी पाऊस पडणार असल्याने पेरणीसाठी अतिशय पोषक वातावरण निर्माण झालंय.”
7 ते 10 जून शेत तयार ठेवा
7, 8, 9 आणि 10 जून या चार दिवसांत पावसाच्या सरी परत येणार आहेत. त्यामुळे ज्यांनी अजून शेताची तयारी केली नसेल, त्यांनी 12 जूनपर्यंत ही कामं उरकून घ्यावीत, असा सल्ला डखांनी दिला आहे. कारण नंतरचा पाऊस इतका जोरात असेल की, शेतीवर कामं करणं शक्य होणार नाही.
हे पण वाचा | पंजाबराव डख यांचा 2025 चा पावसाळी अंदाज: यंदाचा पाऊस देईल का शेतकऱ्यांच्या आशांना जीव?
13 ते 18 जून वडे, नाले वाहतील
13 जूनपासून राज्यात अक्षरशः पावसाचा कहर पाहायला मिळेल. हे पावसाचे दिवस केवळ शिंतोडे उडवणारे नसून, वडे, नाले वाहवणारे असतील. अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी, नागरिकांनी आणि प्रशासनाने सावधगिरी बाळगणं आवश्यक ठरणार आहे.
कोणकोणते भाग येणार पावसाच्या टप्प्यात?
13 ते 18 जून या कालावधीत महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अनुभवायला मिळणार आहे.
हे पण वाचा | पंजाबराव डख यांचा 2025 चा पावसाळी अंदाज: यंदाचा पाऊस देईल का शेतकऱ्यांच्या आशांना जीव?
जोरदार पाऊस होणारे प्रमुख भाग खालीलप्रमाणे –
- पश्चिम महाराष्ट्र : पुणे, मुंबई, नाशिक, संगमनेर, नगर
- मराठवाडा : लातूर, नांदेड, बीड, धाराशिव, सोलापूर
- दक्षिण महाराष्ट्र : सातारा, सांगली, कोल्हापूर
- उत्तर महाराष्ट्र : धुळे, नंदुरबार, जळगाव
- विदर्भ : अमरावती, अकोला, बुलढाणा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, हिंगोली
असा प्रचंड मोठा पट्टा पावसाखाली येणार आहे. म्हणजे शहरी भाग असो वा ग्रामीण – सगळीकडे पावसाची झड लागणार, हे नक्की!
पेरणीसाठी ‘हिरवा सिग्नल’
डख सांगतात की, आता सर्व भागात शेतजमिनीमध्ये पुरेशी ओल आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने पेरणीसाठी वाट बघू नये. ‘कोणी वंचित राहणार नाही’ हे वाक्य त्यांनी ज्या विश्वासाने उच्चारलंय, त्यावरून हवामानाच्या स्पष्ट संकेत मिळताहेत. त्यानुसार पेरणीचा निर्णय प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जमिनीच्या ओल आणि तयारीनुसार घ्यावा.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा