IMD Monsoon Update: दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांचं डोळं आभाळाकडे लागून राहिलं होतं. केव्हा पाऊस येतो, केव्हा आपल्या मातीला ओली श्वास मिळतो, याचीच वाट बघत होते. पण यंदा हवामान खात्याने एक अशी बातमी दिलीय, जी केवळ आकडेवारी नाही, तर शेतकऱ्यांच्या काळजाला हात घालणारी आहे यंदाचा मान्सून वेळेआधीच केरळमध्ये येणार आहे. म्हणजेच आपल्या पेरणीच्या हंगामाला भरघोस सुरुवात होण्याची चिन्हं आहेत. सध्या संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. त्याचबरोबर आता मान्सूनचा पाऊस देखील वेळेआधी महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची बातमी समोर येत आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या तारखेला मिळणार 11 व्या हप्त्याचे 1,500 रुपये?
भारतीय हवामान विभागानं नुकताच दिलेला अंदाज सांगतो की, येत्या २५ मेपर्यंत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर पोहोचेल, जो की नेहमीच्या वेळेपेक्षा अगदी सहा दिवस आधीच आहे. २००९ नंतर तब्बल १६ वर्षांनी मान्सून इतक्या लवकर येतोय हे विशेष. त्यामुळे महाराष्ट्रातील, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी बांधवांसाठी ही बातमी म्हणजे एक नवा आशेचा किरण आहे.
गेल्या काही दिवसांपासून दक्षिण कोकण, गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही फळबागा उध्वस्त झाल्या, तर कुठे वीजांचा धक्का बसला. पण याच काळात आयएमडीनं सांगितलेली ही गुडन्यूज थेट काळजाला स्पर्शून जाते – यंदा सरासरीच्या १०७% पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा अर्थ, पावसाचं प्रमाण चांगलं राहणार, आणि त्यामुळे पीक उत्पादनातही वाढ होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा | कांद्याच्या भावात मोठी वाढ! पहा कोणत्या बाजारात किती दर मिळाला?
हा अंदाज केवळ हवामान शास्त्रज्ञांचा निष्कर्ष नसून, तो शेतकऱ्यांच्या आशेचा आधार आहे. यामुळे आता अनेक भागांमध्ये मशागत सुरू झाली आहे. बैलजोडीची नांगरट, ट्रॅक्टरचा आवाज, आणि मातीला लागणारी माणसाची उब हे सारे दृश्य पुन्हा जिवंत होऊ लागलेत. IMD Monsoon Update
पंधरा जूनपर्यंत मान्सून देशभरात पोहोचेल, असंही आयएमडीनं सांगितलंय. त्यामुळे आता खरीप हंगामाची तयारी जोमानं सुरू होईल. बियाणं, खतं, शेती औजारे यांचं नियोजन शेतकरी करत आहेत. काही ठिकाणी गावातील चौकात जमलेली मंडळी आता राजकारण, महागाई याऐवजी पावसावर चर्चा करताना दिसतायत. कारण शेती हीच त्यांची खरी अर्थव्यवस्था आहे.
हे पण वाचा | महसूल विभागाने घेतला मोठा निर्णय! आता शेतात जाण्यासाठी रस्त्याचे टेन्शन मिटणार; जाणून घ्या सविस्तर
शेवटी इतकंच सांगावंसं वाटतं निसर्ग जर साथ देत असेल, तर माणूस कितीही संकटं झेलूनही उभा राहतो. यंदा निसर्गाने जरा लवकर दरवाजा ठोठावला आहे. आता आपणही तयारा व्हायला हवं. कारण पावसाचा प्रत्येक थेंब हे सोनं आहे, आणि या सोन्याचं पीक आपल्या मातीतच उगवणार आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईंट करा