मान्सून आलाय, पण पेरणी थांबवा! शेतकऱ्यांनो, कृषी विभागाचा दिलासा देणारा सल्ला ऐका…”


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

monsoon update 2025 : यंदा मे महिन्याच्या अखेरच मान्सूनने राज्यात दमदार एन्ट्री घेतली. विदर्भापासून ते मराठवाड्यापर्यंत जोरदार पावसाने धडक दिली आणि आकाशातून जणू सोनं बरसल्यासारखं वाटायला लागलं. पण या पावसाच्या झोडपाट्यात शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलाय. पावसाची वेळ झाली खरी, पण इतक्या लवकर त्याचा तडाखा बसतोय, हे कुणाच्या गावीही नव्हतं. शेतात आता पाणीच पाणी झालंय, मशागत तर लांबची गोष्ट राहिली. शेतकऱ्यांच्या डोळ्यात समाधानाचा थेंब यायच्या आतच प्रश्नांचं वादळ उठलंय “पेरणी कधी करू? आता की थांबावं?”

हे पण वाचा :– राज्यामध्ये होणार मुसळधार पाऊस ! हवामान विभागाची माहिती 

कृषी हवामानतज्ज्ञांचा यावर स्पष्ट सल्ला आहे

राज्याच्या अनेक भागांत मे महिन्यात सरासरीच्या १० पट पाऊस झालाय. बियाण्याच्या गोण्या सज्ज आहेत, पण वाफसा नाही. काळ्या खोल जमिनीत पेरणीसाठी योग्य ‘वाफसा’ यायला अजून ८ ते १५ दिवस वाट बघावी लागेल. हे सगळं ऐकून एखादा जिद्दी शेतकरी पेरणी करून मोकळा होईल, पण निसर्गाच्या मनात काय चाललंय, हे कुणालाच माहिती नाही! monsoon update 2025

पेरणीची घाई नुकसान करू शकते

ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे सांगतात की, “राज्यात ३ जूनपर्यंत मान्सूनचा पहिला टप्पा चालणार आहे. त्यानंतर हवामानात बदल होईल. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटीच म्हणजे ५-७ जूनदरम्यान पेरणीला सुरुवात करावी.” त्यातही, ज्या भागात अजूनही मुसळधार पावसाची शक्यता आहे, तिथं तर अजून संयम ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण एकदा बी पेरलं की, पाऊस थांबला तर उगमच होणार नाही आणि पिकं कोमेजून जातील. ही स्थिती कोणत्याही शेतकऱ्याच्या हातात नाही. त्यामुळे थोडं थांबावं, पाऊस स्थिर होईपर्यंत बघावं, असा दिलासा कृषी विभागानं दिला आहे.

हे पण वाचा :– राज्यामध्ये होणार मुसळधार पाऊस ! हवामान विभागाची माहिती 

फळबागा संकटात..

एका शेतकऱ्याने सात लाख रुपये खर्च करून आंब्याची दहा एकर बाग उभी केली. मनात होती हुरहुर यावर्षी चांगला माल येईल, शहरात पाठवता येईल. पण मेच्या या अघोषित पावसाने त्याचं स्वप्न धुळीस मिळालं. फळ गळून पडलं, बाग ओलसर झाली, बाजारात माल पोहचायच्या आधीच नुकसान झालं. यासारख्या कितीतरी शेतकरी यंदा संकटात आहेत. फळबागा, बागायती पीकं, उन्हाळी भाजीपाल्याला हा पाऊस झेपलेला नाही. पण या सगळ्यातही एक दिलासा म्हणजे खरीप हंगाम अजून सुरू झालेला नाही. आणि खरं शेतकऱ्याचं सोनं तर खरीपातच तयार होतं.

थोडा संयम, मोठं यश!

शेतकरी बंधूंनो, सध्या आकाशातून पाऊस कोसळतोय आणि जमिनीचं पोट भिजतंय. पण बियाण्याला धर धर उगवायला हवं तर जमिनीचा वाफसा तयार असायला हवा. यासाठी अजून काही दिवस थांबावं लागेल. पेरणीची घाई म्हणजे आर्थिक फटका, वेळेवर पेरणी म्हणजे भरभरून सुगी!

पावसाच्या थेंबांसोबत आपल्या आशा वाढतात, पण त्या आशा फलद्रूप होण्यासाठी थोडा संयम लागतो. शेतात पाणी आहे, आभाळ भरलेलं आहे, मनात काळजी आहे. पण या काळजीच्या ढगांमागे नक्कीच सोनं उगवेल – फक्त थोडी वाट पाहावी लागेल. “पेरणी ही नुसती बी टाकायची गोष्ट नाही, ती विश्वासाचं पीक आहे. आणि विश्वासाला थोडा वेळ द्याल, तर त्याचं सोनं नक्की फळतं!”

हे पण वाचा :– राज्यामध्ये होणार मुसळधार पाऊस ! हवामान विभागाची माहिती 

Leave a Comment