सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटले अजित पवारांनी मान्य केलं चूक अदिती तटकरे म्हणाल्या  “मे महिन्याचा हप्ता लवकरच!”


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

May Month Payment Update :- मुलींसाठी सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा उद्देश गरीब व गरजू महिलांना आधार देण्याचा होता. पण या योजनेचा गैरफायदा घेत हजारो महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड झालं आहे. यात वर्ग तीन आणि वर्ग चारमधील महिला कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग असून, शासन नियम धाब्यावर बसवत लाखो रुपयांचा अपहार केल्याचं स्पष्ट झालंय.

हे पण वाचा :– मे आणि जूनचा हप्ता एकत्र? ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे अजूनही नाहीत खात्यात, महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण

या प्रकरणावर आता राज्यात मोठा राजकीय वादंग पेटलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुद्द चूक मान्य करत ही गोष्ट दुर्लक्ष करता येणार नाही, असं म्हटलं आहे. त्यांचं हे वक्तव्य आल्यानंतर विरोधकांनी या योजनेवरून सरकारला चांगलंच घेरण्यास सुरुवात केली आहे. “ही योजना चुकीच्या लोकांच्या हाती गेली,” असा आरोप करत महायुती सरकारची चांगलीच कोंडी करण्यात आली आहे.

अदिती तटकरे यांचा स्पष्टीकरणाचा पवित्रा

दरम्यान, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं की, “लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. काही सरकारी महिलांनी चुकीने पैसे घेतले, हे जानेवारी महिन्यातच लक्षात आलं होतं. म्हणूनच त्यावेळी पैसे थांबवण्यात आले.” त्यांनी लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन ठाम असून, “मे महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात जमा केला जाईल,” असं तटकरे म्हणाल्या.

हे पण वाचा :– मे आणि जूनचा हप्ता एकत्र? ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे अजूनही नाहीत खात्यात, महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण

तटकरे यांनी सांगितलं की, “सरकारी योजना आहे, चुका सुधारण्याचे अधिकार आमच्याकडे आहेत. पण योजना बंद होईल, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. ही योजना आमचं सरकार बंद करणार नाही, गरजू महिलांना याचा लाभ मिळत राहील.”

एक लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची तपासणी धक्कादायक निष्कर्ष

अधिकृत आकडेवारीनुसार, १ लाख ६० हजार ५५९ महिला-पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली, त्यात २ हजार ६५२ महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे उचलल्याचे उघडकीस आलं. सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेतून लाभ घेण्यास मज्जाव असूनही त्यांनी अर्ज भरले आणि थेट बँक खात्यात पैसेही घेतले.

यात फक्त एवढंच नाही तर आणखी ६ लाख कर्मचाऱ्यांची तपासणी प्रलंबित आहे, असा खुलासा सूत्रांनी केला. तसंच ८ लाख ८५ हजार महिलांनी ‘नमो शेतकरी’ आणि ‘लाडकी बहीण’ या दोन्ही योजनांचा लाभ घेतल्याचंही तपासात पुढे आलं आहे.

कॅबिनेटमध्ये मुद्द्यांची झडती  ऊसतोड महिलांचं भानही

राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत योजनेतील घोटाळ्याबरोबरच इतरही विषयांवर चर्चा झाली. ऊसतोड मजूर महिलांच्या मुद्द्यावर थेट चर्चा झाली नाही, मात्र अदिती तटकरे यांनी या विषयाची गंभीर दखल घेतल्याचं सांगितलं. जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेल्या अहवालाची चौकशी सुरु आहे आणि यावर त्वरित तोडगा काढण्याचा सरकारचा मानस असल्याचं त्यांनी नमूद केलं.

आयुष्यात अनेक नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment