IMD Update Today : राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने ऐन पेरणीच्या वेळेस दांडी मारली होती. अनेक ठिकाणी अजून पेरणी झालेली नाही तर काही ठिकाणी आता पेरणीला सुरुवात झालेली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांची पेरणी झाली होती त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये काळजी करण्यासारखं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु आता काळजी करण्याचे काही कारण नाही. राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे याच परिस्थितीवरती हवामान खात्याने पुन्हा एकदा एक मोठा हवामान अंदाज वर्तवला आहे. तर हवामान खात्याचा नवीन अंदाज काय आहे एकदा पण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. IMD Update Today
राज्यामध्ये पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झालेला आहे, येत्या पाच दिवसात बहुतांश भागात पावसाचा जोर वाढणार आहे, अशी माहिती हवामाना खात्याने दिली आहे. 19 जुलै साठी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या अंदाजामध्ये अनेक जिल्ह्यांना सावध राहण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.
कुठे किती पाऊस?
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण आणि विदर्भ पट्ट्यामध्ये सर्वाधिक पडण्याची शक्यता आहे, या दोन्ही भागात बहुतांशी ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात असंच हलकं मध्यम स्वरूपाचा हवामान राहिला असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
कोणत्या 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट

हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी राज्यातील तब्बल 16 जिल्ह्यांना मोठा हवामान अंदाज जारी केलेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अहिल्यानगर, पुणे आणि पुणे घाट परिसर, परभणी, बीड, हिंगोली, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, आणि यवतमाळ या हवामाना त अंदाज वरून एकच गोष्ट स्पष्ट होती की, यंदा विदर्भातील जवळपास सर्वच प्रमुख जिल्हे अलर्ट झोन मध्ये आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना विशेष सतर्क राहण्याची गरज आहे.
मुंबईकरांसाठी काय स्थिती?
हवामान खात्याने दिलेल्या अपडेट नुसार, मुंबई शहर आणि उपनगरामध्ये 19 जुलै रोजी आकाश साधारणपणे ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल आणि मेघा गर्जना सहसरींचा अंदाज आहे. कमल किमान तापमान दोन्ही सुमारे 32°c च्या आसपास राहील, असं हवामान विभागाने स्पष्ट सांगितले आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना पाळणे गरजेचे आहे यामध्ये अनावश्यक प्रवास टाळावा, विशेषता घाट रस्त्याने पूर पवन भागात. तसेच शेतकऱ्यांनी मुसळधार पावसाचा अंदाज घेऊन शेतीच्या कामाचे नियोजन करावे आणि उभपिक साठवलेलं धान्य सुरक्षित ठिकाणी हलवावं. नदी नाल्यांसाठी राहणाऱ्या कुटुंबांनी प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे. हवामान खात्याच्या या इशाराकडे नियमितपणे लक्ष ठेवावे कारण पुढील पाच दिवसात पावसाचा जोर टप्प्याटप्प्याने वाढण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील माहिती उपलब्ध हवामान वृत्तांच्या आधारे संकलित करण्यात आली आहे. तुमच्या जिल्ह्यासाठीचा अद्ययावत आणि अचूक इशारा भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अधिकृत संकेतस्थळावर किंवा अॅपवर तपासावा.)
हे पण वाचा : 12 आणि 13 नोव्हेंबरला मोठ हवामान संकट; हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घ्या
