शेतकऱ्यांनो, पावसाची वाट पाहताय? हवामान खात्याचा ‘हा’ धक्कादायक अंदाज नक्की वाचा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Updates: सध्या महाराष्ट्रात पावसाच्या आगमनाबाबत एक प्रकारची धाकधूक आणि अस्वस्थता आहे. मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या सुरुवातीला आलेल्या मान्सूनपूर्व सरींनी थोडा दिलासा दिला खरा, पण खऱ्या अर्थाने मान्सून अजूनही रुजू झालेला नाही. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनचे वारे सध्या थंडावले आहेत आणि त्यांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण तयार होत नसल्याने राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाची शक्यता सध्या तरी दिसत नाहीये.

हे पण वाचा| महाराष्ट्रात मान्सूनचे दमदार पुनरागमन: पंजाबराव डखांचा या जिल्ह्यांना ‘अलर्ट’; जिल्ह्यांची यादी इथे पहा

राज्याच्या बहुतांश भागांत, विशेषतः मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच उष्णतेची लाट कायम आहे. काही ठिकाणी पारा ४२ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून, उन्हाचा प्रचंड त्रास लोकांना सहन करावा लागतोय. पावसाची चिन्हे दिसत असली तरी, त्याचे प्रमाण खूपच कमी आणि तुरळक आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो आहे, विशेषतः कोरडवाहू शेती करणाऱ्या बांधवांची चिंता वाढली आहे. Weather Updates

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जरी पुण्यात मान्सून सरासरी वेळेपेक्षा १४ दिवस आधी दाखल झाला असला तरी, मुसळधार पावसाचा जोर कमी पडला आहे. आता मान्सूनची गती थांबली असून, पुढील काही दिवसांत मोठ्या पावसाची शक्यता कोणत्याही भागात नाही. बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात अजूनही पुरेसे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झालेले नाही. त्यामुळे मुसळधार पावसासाठी आपल्याला अजून काही काळ वाट पाहावी लागेल.

हे पण वाचा| खरिपाच्या तोंडावर तुरीची आवक वाढली; तुमच्या जिल्ह्यातील बाजारभाव काय?

राज्यातील हवामानाचा अंदाज पाहता १३ किंवा १४ जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र तोपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांतच हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि संध्याकाळनंतर हलक्या पावसाच्या सरी अनुभवता येतील, पण या सरींना शाश्वत पावसाचे लक्षण मानू नये.

या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांनी सध्या पेरणीसाठी घाई करू नये. कारण जमिनीत पुरेसा ओलावा नाही आणि पुढील काही दिवस पावसाचा अभाव राहणार असल्यामुळे पेरणी वाया जाण्याची शक्यता आहे. विशेषतः कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांनी १५ जूननंतरच्या हवामानाचा अंदाज पाहूनच शेतीची तयारी करावी. लागवडीसाठी अनुकूल हवामान तयार होईपर्यंत वाट पाहणे अधिक योग्य ठरेल.
शेतकऱ्यांनो, निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव आपल्याला नवीन नाही. धीर धरा आणि हवामान विभागाच्या पुढील सूचनांकडे लक्ष द्या. घाई न करता योग्य वेळेची वाट पाहणेच आपल्या हिताचे आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “शेतकऱ्यांनो, पावसाची वाट पाहताय? हवामान खात्याचा ‘हा’ धक्कादायक अंदाज नक्की वाचा”

Leave a Comment