महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला! पुढील आठवडाभर या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Update: राज्यात सध्या पावसाने सर्वत्र थैमान घातले आहे. अनेक भागांमध्ये ढगफुटी झाल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाला आहे. मे महिना म्हटलं की अंगाची लाहीलाही करणारा ऊन, पण यंदा मात्र निसर्गाने वेगळाच रंग दाखवला. अवकाळी पावसाने मे महिन्यात धडाकाच दिला. सूर्यसुद्धा आभाळाच्या ढगांआड लपून बसला. ढगांच्या गडगडाटात मान्सूनचं आगमन जवळ आलंय, हे आता स्पष्ट झालं आहे.

राज्यात पावसाचा जोर वाढला असून पुढच्या आठवडाभरात पाऊस धो-धो कोसळणार आहे. कोकण, गोवा, कर्नाटक ते गुजरातपर्यंत सगळीकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन ‘शक्ती’ नावाचं चक्रीवादळ होण्याची दाट शक्यता आहे.

हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या तारखेला मिळणार 11 व्या हप्त्याचे 1,500 रुपये?

रायगड-रत्नागिरीत रेड अलर्ट –

हवामान विभागाने रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला थेट रेड अलर्ट दिला आहे. समुद्र किनारी वाऱ्याचा वेग ताशी ६० किमीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमारी थांबवण्याचा सल्ला दिला गेला आहे. कोकणात माणसांच्या घरात पाणी घुसलंय, काही ठिकाणी लग्नाचे मंडप चिंब झालेत, लोकांची धावपळ उडाली आहे.

मुंबईतही पावसाचा शिडकावा

मुंबईतल्या उपनगरांतही पावसाची जोरदार सुरुवात झाली आहे. लोअर परळ, अंधेरी, घाटकोपर भागांत रस्त्यांवर पाणी साचलंय. ऑफिसला जाणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे वेळापत्रक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. Maharashtra Rain Update

हे पण वाचा | या तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार, पंजाबराव यांचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा..

अमरावतीत ५० गावांचं नुकसान –

विदर्भात अवकाळीने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. अमरावती जिल्ह्यात ५० गावांतील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. २५५ हेक्टरवर कांदा, भुईमूग, केळी, संत्रं, ज्वारी यावर पावसाचा फटका बसलाय. १६ गावांमध्ये घरांची पडझड झाली आहे. ११ गुरं मृत्युमुखी पडली आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तर हृदयात वेदना भरून राहिल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर मध्ये वादळी वाऱ्यांनी उडवली पत्र्याची घरे

पैठण तालुक्यात थेरगावमध्ये वादळी वाऱ्यांनी थैमान घातलं. मोसंबी, पपई, डाळिंब यांची झाडं तुटून घरांवर पडली. शेकडो घरांवरील पत्र्यांचे छप्पर उडून गेले. शेडनेट उन्मळून पडल्याने शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. गावकरी सैरभैर झालेत. विजेचे खांब आणि तारा पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झालाय.

हे पण वाचा | लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज ! ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार 11वा हफ्ता

धाराशिव व तुळजापूर मध्ये आंबा, केळी बागा उद्ध्वस्त

धाराशिव जिल्ह्यात गेल्या ८ दिवसांपासून संततधार सुरू आहे. ७ मंडळात अतिवृष्टी नोंदवली गेली. आंब्याच्या बागा, भाजीपाल्याचं उत्पादन बरबाद झालं. वीज खांब पडून अनेक गावं अंधारात आहेत. तुळजापुरात मुसळधार पावसामुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली. लग्न मंडपात नववधू-वरांची फजिती झाली. शेतकऱ्यांचं जगणं हे आभाळाकडे पाहत चालतं. उघडीप मिळाली की मशागत सुरू करायची, पण यंदा पावसाने सगळी गणितं बिघडवली. कोकणापासून विदर्भापर्यंत शेतकरी, मच्छीमार, चाकरमानी, व्यापारी – सगळेच या पावसाच्या झोडपाट्यात सापडले आहेत.

निसर्गाच्या या अवकाळी रौद्र रूपानं सांगितलंय, की संकटं केव्हा कुठून येतील सांगता येत नाही. पण माणुसकीच्या एकमेकांच्या आधारावर आपण ही सुद्धा वेळ पार करू शकतो. आज पावसाचा कहर आहे, पण आशेची एक किरण सुद्धा त्या ढगांच्या आड असते.

असाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप वर जॉईन करा

Leave a Comment