मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून 50 लाख महिलांचे अर्ज बाद होणार; कारण काय? पहा सविस्तर..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक विकासासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत लाभार्थी महिलांना सात हप्त्याचे एकूण दहा हजार पाचशे रुपये मिळाले आहेत. यानंतर महिलांना आठव्या हप्त्याचे म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच या योजनेचा पुढील हप्ता महिलांना देण्यात येणार आहे. Ladki Bahin Yojana

दरम्यान या योजनेअंतर्गत अनेक महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्या आहे. ही बाब सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने यावर कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली. या योजनेतील महिलांच्या अर्जाची पडताळणी सध्या सुरू आहे. या योजनेत पात्र नसताना योजनेचा लाभ घेत असलेल्या जवळपास नऊ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजनेत 50 लाख महिलांचे अर्ज बाद होणार असल्याचे सांगितले जात आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या दोन कोटी 46 लाख आहे. त्यातून 50 लाख महिला अपात्र असून त्यांना या योजनेतून बाहेर काढले जाणार आहे. यामुळे सरकारच्या तिजोरी वरील ताण कमी होणार आहे.

सरकारच्या योजनेतून करोडपती होण्याची संधी! अशाप्रकारे महिन्याला मिळवा 1 लाख रुपये पेन्शन

जर लाडकी बहिणी योजनेतून 50 लाख महिला अपात्र झाल्या तर दरवर्षाला १६२० कोटी रुपये सरकारची बचत होणार आहे. या योजनेत दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. दर महिन्याला सरासरी 3700 कोटी रुपयांचा हप्ता वितरित केला जात आहे. आतापर्यंत सहा महिन्यात तब्बल 21 हजार 600 कोटी रुपयाचे हप्ते महिलांना वितरित करण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील इतर आर्थिक योजनेवर ताण पडला आहे. या योजनेमुळे इतर अनेक योजनेचे पैसे वाटण्यास वेळ होत आहे असे सांगितले जात आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचे दिसत आहे.

50 लाख महिला होणार अपात्र

लाडकी बहीण योजनेत सध्या लाभार्थी महिलांची पडताळणी वेगात सुरू आहे. ही पडताळणी पाच टप्प्यांमध्ये केली जात आहे. यामध्ये महिलांची वय मर्यादा, इन्कम टॅक्स भरत असलेल्या महिला, चार चाकी वाहन असलेल्या कुटुंबातील महिला, इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांची तपासणी केली जात आहे. जानेवारी महिन्यात पाच लाख महिलांचे अर्ज या योजनेतून बात करण्यात आले आहेत. तर फेब्रुवारी महिन्यात चार लाख महिलांच्या अर्ज बाद झाले आहेत. यामुळे सरकारी तिजोरीवरील बोजा काही प्रमाणात कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 50 लाख महिला या योजनेतून बाद होणार आहेत. जर असे झाले तर सरकारच्या तिजोरी वरील बोजा कमी होणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून 50 लाख महिलांचे अर्ज बाद होणार; कारण काय? पहा सविस्तर..”

Leave a Comment