पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज! मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj: सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांपासून ते सामान्य माणसांपर्यंत प्रत्येकाच्या मनात हवामानाबाबत एक अनामिक भीती दाटून आलेली आहे. कारण नुकताच प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेला नवा पावसाचा अंदाज ही चिंता आणखी वाढवणारा ठरला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, २२ मे ते ३० मे या काळात महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, आणि तोसुद्धा काही किरकोळ थेंब नाही, तर जनजीवन विस्कळीत करणारा असणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी पंजाबराव डख यांचा हा हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आहे.

गेल्याच काही आठवड्यांपूर्वी राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. काहींचे पिकं उभी असतानाच पाणी पडून वाया गेली, काहींनी काढून ठेवलेलं पीक सडून गेलं. त्या जखमा अजून भरूनही निघालेल्या नाहीत, आणि आता पुन्हा डखांचा नवा इशारा – यामुळे ग्रामीण भागात तणावाचं वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. त्यानंतर आता पुन्हा पंजाबराव यांनी सांगितलेला हवामान अंदाज ऐकून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

हे पण वाचा | पीक विमा योजनेतून ‘हे’ शेतकरी अपात्र! काय आहे कारण? वाचा सविस्तर..

कोणत्या भागात होईल सर्वाधिक पाऊस

डख यांच्या अंदाजानुसार, मुंबईत सर्वाधिक मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शहरात वाहतूक, वीजपुरवठा आणि दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम होणार आहे. त्याचबरोबर नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, कोकणातील इतर भाग, तसेच खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ या भागांनाही जोरदार पावसाचा फटका बसू शकतो. विशेषतः अहिल्यानगर जिल्हा, ज्याचा हवामान अंदाज नेहमीच गोंधळात असतो तेथे देखील अतिवृष्टीची शक्यता डख यांनी वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पंजाबराव डोक्यांचा हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे.

शेतकऱ्यांसाठी डखांचा इशारा म्हणजे धोक्याची घंटा

हा पाऊस काही भागात दोन-दोन दिवसांच्या अंतराने येणार असून, त्यामुळे जमिनीत सुमारे एक फूट ओलावा साठेल. खरं तर खरीप हंगामासाठी ही बाब काही प्रमाणात चांगली वाटू शकते. पण याच वेळी, ज्यांची पिकं अजून शेतातच उभी आहेत किंवा साठवलेली आहेत, त्यांच्यासाठी ही वेळ जीवघेणी ठरू शकते. मुसळधार पावसामुळे पीक सडू शकतं, शेतात पाणी साचल्यामुळे बियाणं खराब होऊ शकतं, आणि मजुरांनाही शेतीकाम करताना अडचणी येऊ शकतात.

हे पण वाचा | पोस्ट ऑफिस च्या ‘या’ योजनेतून फक्त व्याजातूनच मिळणार 3 लाख रुपये नफा! कशी करावी गुंतवणूक? जाणून घ्या सविस्तर

घरं, जनावरे, आरोग्य… सगळंच धोक्यात!

पाऊस हा केवळ शेतीवरच परिणाम करत नाही, तर तो घरांवर, जनावरांवर, शाळा-कोलेजांवर, दवाखान्यांवर, सगळ्याच गोष्टींवर परिणाम करतो. ओढे-नाले भरून वाहू लागले तर गावात पाणी शिरण्याची भीती असते. विजेच्या तारा ओढल्या जातात, रस्त्यांवर खड्डे पडतात. अशा वेळी घरातील वृद्ध, लहान मुलं, महिलांना त्रास होतो. अनेकांच्या अंगावरचे कपडे, संसाराचे जिन्नस पावसामुळे भिजतात, खराब होतात.

आता काय करावं?

या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आता अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. पीक काढणी पूर्ण नसेल तर ती शक्य तितक्या लवकर पूर्ण करावी. पीक वाचवण्यासाठी तात्पुरत्या आडोश्यांची व्यवस्था करावी. जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावं. बियाणं, खतं, औषधं अशा गोष्टी उंच जागी ठेवाव्यात. जमेल तितक्या कामांसाठी हवामानाचा अंदाज डोळ्यासमोर ठेवावा.

हे पण वाचा | महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ! महाराष्ट्राला या जिल्ह्यामध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट

प्रशासनानेही उचलले पाहिजेत पावलं

प्रशासनानेही या संभाव्य संकटाचा अंदाज घेऊन वेळीच उपाययोजना राबवायला हव्यात. ग्रामपंचायत स्तरावर सूचना दिल्या पाहिजेत. मदतकार्य यंत्रणा सज्ज ठेवायला हव्यात. शाळा बंद ठेवाव्या लागल्या तरी वेळेवर निर्णय घेणं गरजेचं आहे. Panjabrao Dakh Havaman Andaj

पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज गेल्या कित्येक वर्षांपासून बिनचूक ठरत आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात त्यांचा इशारा म्हणजे एक प्रकारचा सावधानतेचा इशारा मानला जातो. त्यामुळे हे वाचून जर तुम्ही अजूनही ‘आता काही होणार नाही’ अशा मानसिकतेत असाल, तर कृपया सावध व्हा. पावसाचा फायदा तेव्हाच होतो, जेव्हा तो योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पडतो. पण हवामानाचा लहरीपणा कधीही संकट घेऊन येतो. त्यामुळे काळजी घेणं, योग्य नियोजन करणं आणि वेळेवर पावलं उचलणं हाच या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे.

अशाच नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment