Panjabrao Dakh Havaman Andaj: राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नुकताच एक हवामान अंदाज वर्तवला आहे. या हवामान अंदाज मध्ये त्यांनी राज्यात पुढील काही दिवसात तापमानाचा पारा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असल्याचा अंदाज देखील त्यांनी वर्तवला आहे. या लेखामध्ये पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाज बद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील पुढील चार-पाच दिवस म्हणजेच 30 मार्चपर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असून राज्यात जवळपास गुढीपाडव्यापर्यंत तापमान वाढण्याची शक्यता डख यांनी वर्तवली आहे. त्याचबरोबर त्यानंतर महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. 31 मार्चनंतर राज्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. Panjabrao Dakh Havaman Andaj
हे पण वाचा | पीएम किसान योजनेच्या अर्जात दुरुस्ती कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती..
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 ते 31 मार्च दरम्यान राज्यात तापमान वाढणार आहे. यामुळे या काळात शेतीची सर्व महत्त्वाची कामे शेतकऱ्यांनी पूर्ण करून घ्यावी. कारण एक एप्रिल पासून राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. राज्यात अवकाळी पावसाचे सत्र सुरू होण्याची दाट शक्यता डख यांनी वर्तवली आहे. राज्यात एक एप्रिल पासून अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे. खरंतर सध्या सर्वत्र मान्सून बाबत चर्चा रंगत आहेत. यंदाचा मान्सून कसा राहणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होत आहे.
अनेक हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी यावर्षी मान्सून महाराष्ट्र सोबत संपूर्ण भारतात चांगला राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त किंवा सरासरी एवढा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. हवामान अंदाज वर्तवणाऱ्या या संस्थेचा अंदाज खरा ठरला तर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जागतिक हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थाचा अंदाज राज्यातील शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरू शकतो.
हे पण वाचा | मोठी बातमी! कांद्यावरील निर्यात शुल्क हटवला; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय..
मात्र भारतात हवामान कसा राहणार हे भारतीय हवामान खात्याच्या मान्सून 2025 च्या पहिल्या अंदाजावर स्पष्ट होणार आहे. भारतीय हवामान विभागाने एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून 2025 चा पहिला अंदाज वर्तवण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय हवामान खाते यंदाच्या मान्सून बाबत काय अपडेट देते याकडे संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. असे असताना एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन कर
3 thoughts on “पंजाबराव डख: राज्यात पुढील काही दिवस तापमान वाढणार! राज्यात या तारखेला अवकाळी पावसाची शक्यता..”