agriculture scheme maharashtra : आपला देश हा शेतीप्रधान देश आहे भारत देशातील मिळवून अधिक जनसंख्या शेतीवर अवलंबून आहे. यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. भारतातील शेतकऱ्यांसाठी प्रामुख्याने राबवली जाणारी प्रधानमंत्री पी एम किसान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये इतकी रक्कम दिली जात आहे.agriculture scheme maharashtra
पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति वर्ष सहा हजार रुपये रक्कम दिले जाते. परंतु हि 6 हजार रुपये रक्कम दोन हजार रुपयाचा एक हप्ता असे तीन हप्ते पूर्ण वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जात आहे. पी एम किसान योजनेअंतर्ग शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 18 हप्ते प्राप्त झाले आहे व शेतकरी आता 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा करीत आहे.
शेतकऱ्यांसाठी एक नवीन अपडेट आली आहे, ती म्हणजे सरकार पी एम किसान योजनेचे रकमेत वाढ करण्याच्या विचार करीत आहे. सध्या या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति वर्ष सहा हजार रुपये रक्कम दिली जाते व आता शेतकरी वर्ग खुश करण्यासाठी केंद्र सरकार या रकमेमध्ये वाढ करून ही रक्कम 6,000 हजार रुपयावरून आता ती 10,000 हजार रुपये करण्यात येणार आहे.
म्हणजेच आता पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना अतिरिक्त चार हजार रुपये मिळणार आहेत. याबद्दलची माहिती अधिकृत माहिती आली नाही परंतु सूत्रांच्या माहितीनुसार फेब्रुवारीमध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा होऊ शकते. मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापन झाल्यानंतर हा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प सादर होणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ ?
याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील सरकारने आठवावेतन लागू केला आहे त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्याचे काम सरकारने केले आहे परंतु शेतकऱ्याचा काय म्हणूनच आता शेतकऱ्यांना देखील खुश करण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी येऊ देत वाढ करण्यात येणार आहे.