खुशखबर! या 23 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टीचे 29 कोटी 25 लाख रुपये जमा; तुम्हाला आले का नाही?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Heavy rain damage compensation: राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जून ते सप्टेंबर 2024 दरम्यान राज्यभर झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध विभागातील 23 लाख 65 शेतकऱ्यांसाठी 29 कोटी 25 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून अनुदान देण्यात येणार आहे.

हे पण वाचा | लाडक्या बहिणीच्या खात्यात 48 तासात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार का? पहा सविस्तर माहिती

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार मदत?

राज्य सरकारच्या घोषणेनुसार नाशिक पुणे नागपूर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकऱ्यांना मदतीचा लाभ दिला जाणार आहे. या मदतीचे निकष आधीच ठरवण्यात आले आहेत सरकारने छोटे आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना जास्त मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन हेक्टर शेतीसाठी प्रति हेक्टर 47 हजार रुपयाची मदत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना मिळणारी मदत किमान 5000 रुपये असणार आहे.

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. अनेक ठिकाणी नदीच्या काठावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची शेती वाहून गेली तर काही ठिकाणी पुरामुळे जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली होती, ज्याला राज्य सरकारने सकारात्मक भूमिका दाखवून मान्यता दिली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेले नुकसान भरून करण्यासाठी सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. Heavy rain damage compensation

हे पण वाचा | पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचे पैसे जमा; तुम्हाला मिळाले का नाही? असे चेक करा..

किती शेतकऱ्यांना मदत मिळणार?

या निधीचे वितरण जिल्ह्यानुसार केले जाणार आहे नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्यात 143 शेतकऱ्यांसाठी १३ लाख १ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे विभागातील जिल्ह्यांना मिळणारा निधी 36 लाख 45 हजार रुपयापर्यंत आहे. त्याचबरोबर नागपूर विभागातील शेतकऱ्यांसाठी एक कोटी 42 लाख रुपये निश्चित करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे त्यांनी शेतीसाठी केलेला खर्च देखील आलेल्या उत्पादनातून निघत नाहीये. यामुळे सरकारने शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु काही शेतकऱ्यांनी सरकारच्या मदतीच्या निकषाबद्दल तक्रार केली आहे कारण त्यांना अपेक्षेप्रमाणे कमी मदत मिळण्याची शंका आहे. राज्य सरकारची या मदतीची योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक पुनर्वसनासाठी एक मोठा फायदा होत आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई मधून शेतकरी त्यांच्या दैनंदिन गरजा आणि त्यासोबतच शेतीसाठी लागणारे आवश्यक गोष्टी बाजारांमधून खरेदी करू शकतात. जेणेकरून शेतकऱ्यांना यानंतर पुन्हा एकदा नवीन जोमाने शेती करण्यास मोठी मदत होणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment