sanjay gandhi niradhar yojana : नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी, संजय गांधी निराधार योजनेत लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास करणार आहे. संजय गांधी निराधार योजनेत अनेक ठिकाणी सेवानिवृत्त वेतन घेणारे व मोठे शेतकरी यांचा समावेश आहे. या सर्व बाबीवर सभागृहात चर्चा झाली असून आता अशा प्रकारे बोगस लाभार्थ्यांची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या योजनेत लाभार्थ्यांची पडताळणी होणार असल्याची माहिती देखील विशेष सहाय्यक मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे.sanjay gandhi niradhar yojana
हे पण वाचा :- शेतकऱ्यांना लवकरच मिळणार खरीप पिक विमा भरपाई! कंपनीने दिले लेखी आश्वासन
संजय गांधी निराधार योजना एक महत्वपूर्ण योजना आहे, या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील लाखो नागरिकांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून जे घरातील व्यक्ती कुटुंबाचा आधार नाही, जे दुर्बल आहेत किंवा स्वतःचा उदरनिर्माण करू शकत नाही अशा नागरिकांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते.
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी बोगस आहेत, ही एक अत्यंत गंभीर बाब आहे असे सहाय्यक मंत्री झीरवळ यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले की या योजनेअंतर्गत जर कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे तसेच यामध्ये अधिकारी दोशी आढळल्यास त्याच्यावर देखील कारवाई होणार आहे. ही योजना गरीब व गरजू लोकांसाठी सुरू करण्यात आली होती त्यामध्ये अशा गैरप्रकार खपून घेतला जाणार नाही.
हे पण वाचा :- या योजनेअंतर्गत वर्षाला 436 रुपये भरा ! आणि मिळवा 2 लाख रुपयांचा विमा
या योजनेचे माध्यमातून लाभार्थ्यांना आर्थिक मदत डायरेक्ट त्यांच्या खात्यावरती dbt च्या माध्यमातून जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला देखील तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर केवायसी असणे देखील आवश्यक आहे 38 लाख 11 हजार झालेल्या लाभार्थी आहेत तर 30 लाख 30 हजार लाभार्थ्यांची नोंदणी झालेली नाही या कारणाने याला बदलत्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत जेव्हा सर्व आधार लिंक झाल्यावर ही निधी वितरित केली जाणार आहे.