weather update today : हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यांमध्ये पावसाची उघडीप राहील असा अंदाज वर्तवला आहे. तसेच सोमवारपासून दिनांक 16 सप्टेंबर विदर्भामध्ये पावसाला सुरुवात होईल.असे हवामान विभागांनी सांगितले आहे.
हे पण वाचा :- महिलांनो या सरकारी योजनेत करा गुंतवणूक आणि कमवा घरबसल्या पैसे ! असा करा अर्ज
कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी विदर्भातील पुढील जिल्ह्यात बुलढाणा, अकोला ,अमरावती, यवतमाळ ,वाशिम नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्याला पावसाचा धोका नसेल. अशी माहिती जेष्ठ हवामान तज्ञ डॉक्टर अनुपम कश्यप यांनी दिली आहे. त्यांनी परत महाराष्ट्रात दहा पंधरा दिवस पाऊस असणार असे सांगितले. खास करून विदर्भातील आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार असे ही ते म्हणाले. हा पाऊस प्रतीचा पाऊस आहे. पण हा पाऊस काही जास्त काळ टिकणार नाही. पण सर्व शेतकऱ्यांनी याची खबरदारी घ्यावी असेही त्यांनी आव्हान केले आहे.
हे पण वाचा :- पुढच्या 24 तासांमध्ये या भागात होणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; नवीन अंदाज पाहिला का?
सप्टेंबरच्या महिन्यात एक दोन तारखेपासून पाऊस झाला. पण पूर्ण महिना शांत चाललेला दिसत आहे. पण तसं होणार नाही अगदी सप्टेंबर चे शेवटी सुद्धा पुन्हा पावसाचे पुन्हा आगमन होणार आहे. नवीन अंदाजनुसार,२५ सप्टेंबर पासून पुन्हा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे .असे हवामान विभागाचे तज्ञ डॉक्टर अनुपम कश्यप यांनी सांगितले आहे.weather update today