मान्सूननं घेतली विश्रांती ५ जूनपर्यंत पाऊस थांबणार, शेतकऱ्यांनो घाई नको  हवामान विभागाचा इशारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra rainfall update :- राज्यात यंदा पाऊस वेळेपेक्षा १२ ते १५ दिवस आधीच आलाय. २५ मे रोजी मान्सूननं महाराष्ट्रात पहिली हजेरी लावली आणि पाहता पाहता तो संपूर्ण राज्यात पसरलासुद्धा. पावसाच्या जोरदार सुरुवातीनं शेतकरी आणि सर्वसामान्य माणसात आशेचा किरण निर्माण झाला. पण गेले काही दिवस पाऊस अचानक थांबलाय. आता हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, ५ जूनपर्यंत पावसानं विश्रांती घेतलेलीच राहणार आहे.

हे पण वाचा :– मोफत सोयाबीन बियाणे मिळवण्याची सुवर्णसंध शेतकऱ्यांनी असा अर्ज कराच!

दहा-बारा जूनपर्यंत राज्यात पावसाचं प्रमाण अत्यल्प राहील, असं स्पष्ट केलं जातंय. त्यामुळे हा आठवडा तरी कोरडाच जाईल. राज्यभर तापमान वाढलेलं आहे आणि आभाळही साफ झाल्यासारखं वाटतंय. अचानक आलेल्या पावसानं माती ओली झाली, पेरणीची तयारी सुरू झाली, पण आता पुन्हा उन्हाळ्यासारखं वातावरण जाणवायला लागलंय.

हवामानतज्ज्ञांचं म्हणणं आहे की, यंदा अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून वेळेआधी आला. पण आता बंगालच्या उपसागरातलं हेच हवामान उत्तर दिशेला सरकलंय, त्यामुळे पाऊस थोडा थांबेल. ५ जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होईल, अशी शक्यता आहे.

हे पण वाचा :– लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री अजित पवार यांची सर्वात मोठी घोषणा! याच महिलांना मिळणार लाभ 

शेतकऱ्यांना कृषी विभागाचा इशारा

हवामान खात्याच्या या अंदाजानंतर, कृषी विभागानेही सावधगिरीचा इशारा दिलाय. त्यांनी शेतकऱ्यांना स्पष्ट सांगितलंय की, पेरणी करण्याची घाई करू नका. अजून पावसाचा भरवसा नाही, त्यामुळे ५ जूननंतरच खरीप पेरणी सुरू करा. नाहीतर लावलेली बियाणंच सुकून जातील आणि मोठं नुकसान होईल. ही सूचना खासकरून अमरावती, जळगाव, बुलढाणा, नाशिक आणि अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

अतिवृष्टीमुळे २१ बळी, हजारो हेक्टर शेतीचे नुकसान

जरी सध्या पाऊस थांबलेला असला तरी मागील काही दिवसांच्या अतिवृष्टीनं मोठं संकट निर्माण केलं होतं. राज्यात २१ जणांचा मृत्यू, १२ जखमी, अनेक ठिकाणी प्राण्यांचे मृत्यू, तसेच ४१ हजार हेक्टरवर पिकांचं नुकसान झालंय. पाण्यात बुडणे, वीज कोसळणे, भिंत कोसळणे अशा घटनांनी हळहळ वाटावी अशी स्थिती निर्माण झाली. खरंतर, यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता, पण इतक्या आधीच एवढी अतिवृष्टी होईल, याची कुणालाच कल्पना नव्हती.

हे पण वाचा :– राज्यात पुढील 5 दिवस होणार मुसळधार पाऊस! नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा…

पिकांचं नियोजन नीट करा, हवामान लक्षात घ्या

या सगळ्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी आता पेरणी करताना फक्त आकाशाकडे पाहून नाही, तर हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष दिलं पाहिजे. हवामान बदलतंय, ढगांचं प्रमाण कमी झालंय, आणि उपग्रहाच्या प्रतिमांवरून सुद्धा ५ जूनपर्यंत कोरडे हवामानच दिसतंय.

थोडं थांबा निसर्गाची साथ घ्या

शेती हा निसर्गाशी निगडीत व्यवसाय आहे. त्यात घाई केली, तर नुकसान पक्कं. त्यामुळे शेतीचं नियोजन करताना हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावल्यावरच बियाणं टाका. शेतात आजच गेलात, तर उद्याचं नुकसान तुमचंच आहे. म्हणूनच सरकार, हवामान विभाग आणि कृषी विभागाचीच विनंती  थोडं थांबा, शहाणपणाने वाटचाल करा.

 टीप : या बातमीत दिलेली सर्व माहिती विविध अधिकृत स्त्रोतांवर आधारित आहे. पिकांची पेरणी, बियाणं खरेदी वा कोणतंही आर्थिक निर्णय घेण्याआधी स्थानिक कृषी अधिकारी वा हवामान केंद्राचा सल्ला घ्या.

अशाच अनेक नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला येथे क्लिक करून जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!