ativrushti nuksan bharpai :- राज्य सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेत आहेत. आता पुन्हा राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे जे शेतकरी अतिवृष्टीग्रस्त त्यांच्यासाठी राज्य सरकारने एक नवीन घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी आनंदात आहे पहा कोणती आहे ही नवीन घोषणा.
हे पण वाचा :- लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजून का झाला नाही जमा? आली मोठी माहिती समोर
ज्या शेतकऱ्यांचे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी किंवा पुरामुळे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अनुदान मंजूर झाले आहे. या निर्णयामुळे नाशिक पुणे नागपूर अमरावती व छत्रपती संभाजी नगर विभागातील तब्बल 23 हजार 65 शेतकऱ्यांसाठी एकूण रक्कम 29 कोटी 25 लाख 61 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
राज्य सरकारने दिलेल्या निर्णयानुसार राज्यातील अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन एकर पर्यंत शेतीसाठी प्रति एकरी 47 हजार रुपये ची मदत दिली जाणार आहे. परंतु कोणतीही परिस्थितीची मदत पाच हजार रुपयांपेक्षा कमी असणार आहे तरी अनेक शेतकऱ्यांनी सरकारच्या निकषांपेक्षा कमी मदत मिळत असेल तर त्याची तक्रार केली आहे. अनेक शेतकऱ्यांना मदत मिळत नाही व हे शेतकरी या अनुदानापासून वंचित राहतात.
हे पण वाचा :- शेवटची संधी! या तारखेपर्यंत करून घ्या तुमची रेशन कार्ड E kyc नाहीतर कायमचे बंद होणार?
2024 मध्ये जून ते सप्टेंबर दरम्यान अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याची अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पिकासह जमीन देखील वाहून गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले दिसून आले आहे ज्या कारणाने सरकारने तातडीने हा निर्णय घेतला आहे.
राज्यातील या जिल्ह्यांचा समावेश :–
नाशिक विभाग – जळगाव, पुणे विभाग – पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर विभाग – गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, नागपूर , अमरावती विभाग – अमरावती, अकोला, यवतमाळ ,बुलढाणा, वाशिम, छत्रपती संभाजी नगर विभाग :– परभणी ,लातूर, हिंगोली, धाराशिव, नांदेड, या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्या नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
हे पण वाचा :- या जिल्ह्यातील महिला होणार लखपती! 1 एक लाख 20 हजार महिलांना मिळणार केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ