Ladki Bahin Yojana: राज्य सरकार अंतर्गत चालवली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची काटेकोरपणे पडताळणी होत असून राज्य सरकारने नऊ लाख अपात्र महिलांची नावे योजनेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता निकषानुसार पडताळणी केल्यानंतर ही संख्या तब्बल 40 लाखाच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोणत्या निकषामुळे लाडक्या बहिणी अपात्र होत आहेत त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला दोन लाख तीस हजार या योजनेतून अपात्र झाल्या आहेत. 65 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या एक लाख दहा हजार महिला या योजनेतून अपात्र झाल्या आहेत. चार चाकी गाडी असलेल्या व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या त्याचबरोबर सोयीचे ने या योजनेतून नाव माघारी घेणाऱ्या महिलांची संख्या एक लाख साठ हजार एवढी आहे. फेब्रुवारीत छाननी प्रक्रियेनंतर अपात्र ठरलेल्या दोन लाख महिला आहेत. सरकारी कर्मचारी दिव्यांग मधून अपात्र झालेल्या दोन लाख महिला आहेत.
हे पण वाचा | तुम्हाला आले का 2,000 हजार रुपये! Pm Kisan योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा
यानंतर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकार नवीन निकष लागू करणार आहे. लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेकडे ई केवायसी आणि जीवन प्रमाणपत्र देणे बंधनकारक असणार आहे. सरकारच्या नव्या निर्णयामुळे या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळणार आहे असे सांगण्यात येत आहे. Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या घटल्यामुळे सरकारचे कोट्यावधी रुपयाची बचत होणार आहे. या योजनेमुळे इतर योजनेच्या निधीवर परिणाम होत होता. तसेच सरकारी खर्चात 30 टक्के कपात करण्यात आली आहे. योजनेचा सर्वाधिक फायदा पुणे अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांनी घेतला आहे. सिंधुदुर्ग गडचिरोली मधील लाभार्थ्यांचे प्रमाण सर्वात कमी आहे. 30 ते 39 वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या या योजनेत सर्वात जास्त आहे.
हे पण वाचा | बहिणींना मोठा धक्का! तब्बल 40 लाख महिला होणार योजनेपासून अपात्र ?
या महिला होणार अपात्र
या योजनेतून सुमारे 16.5 लाख महिलांच्या खात्यावरती थेट पैसे पाठवण्यात आले होते त्यांनी अर्जात दिलेले नाव आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नाव यात फरक आढळत आहे. आशा लाभार्थी महिलांची जिल्ह्यानुसार फेर तपासणी करण्यात येणार असून त्यात अपात्र आढळलेल्या लाडक्या बहिणींना या योजनेतून कायमचे बाद करण्यात येणार आहे. ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेची निकषानुसार लिंक केलेले नसेल त्यांनाही या योजनेतून कायमचे बात केले जाणार असल्याचे समोर आले आहे.
सरकारच्या नवीन निकषानुसार जवळपास 30-31 लाख महिला या योजनेतून अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि पडताळणी दरम्यान नऊ लाख महिला या योजनेतून अपात्र होत असल्याची माहिती समोर आली आहे. अशाप्रकारे एकूण जवळपास 40 लाख महिला या योजनेतून अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. ही माहिती सर्व सूत्रांच्या माध्यमातून मिळालेली आहे त्यामुळे ही माहिती शंभर टक्के खरी आहे याची आम्ही हमी देत नाहीत.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
1 thought on “लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! तब्बल 40 लाख लाभार्थी महिला या कारणामुळे होणार अपात्र?”