शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात कर्जमाफी जाहीर होणार का? शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Loan Waiver: विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल अशी अपेक्षा राज्यातील शेतकऱ्यांना होती. मात्र याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही. सरकार अर्थसंकल्पात कर्जमाफी करेल या आशेवर शेतकरी आहेत. भाजप सरकारने केवळ कर्जमाफी नाही तर कर्जमुक्तीचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. म्हणजेच शेतकऱ्यांकडे जेवढे कर्ज आहे तेवढे माफ केले जाईल असा त्याचा अर्थ होतो. भाजप सरकारने निवडून आल्यानंतर आत्तापर्यंत कर्जमाफी बाबत बोलणे टाळले आहे. पण आता दहा मार्च रोजी सादर होणाऱ्या राज्याचा अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करणार का? असा प्रश्न राज्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होईल अशी अपेक्षा देखील आहे.

मागील वर्षी दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन घटले होते. यंदा बाजारभावामुळे शेतकऱ्यांना आपले कर्ज फेडणे शक्य झाले नाही. आणि त्याचबरोबर सरकारने कर्जमुक्तीच्या आश्वासन दिले होते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपले कर्ज भरण्यास टाळाटाळ केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांकडे तब्बल 31 हजार कोटीच्या दरम्यान कर्ज थकले आहे. राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर हा पहिलाच अर्थसंकल्प सादर होणार आहे. महायुतीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आपला शब्द पाळावा आणि कर्जमाफी जाहीर करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. सरकारने सत्य देण्यासाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. त्यासाठी 36 हजार कोटी खर्च झाला आहे. मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 31 हजार कोटी सरकार देऊ शकत नाही का? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या वतीने उपस्थित केला जात आहे.

१ मार्चपासून आधार कार्ड वर लागू होणार नवीन नियम! आता आधार कार्डची कामे होणार झटपट..

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या आश्वासन दिले होते. भाजपाने यापुढे एक पाऊल टाकत कर्जमुक्तीच्या आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू असे वक्तव्य प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. व मुख्यमंत्री आणि त्याकालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कर्जमाफी करण्यात येईल असे सांगितले होते. भाजप आणि महायुतीच्या आश्वासनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठे यश मिळवून दिले. सरकार स्थापन झाल्यापासून शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत. Shetkari Karjmafi

राज्यातील जवळपास निम्म्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांकडे बँकेचे कर्ज थकीत आहे. थकीत पीक कर्जाची रक्कम जवळपास 31 हजार कोटीच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. सध्या चर्चा आहे की सरकारने कर्जमाफीच्या आश्वासन दिल्यानेच शेतकरी कर्ज भरत नाही. ही चर्चा काही प्रमाणात खरी असली तरी हे पूर्णपणे सत्य देखील नाही. कारण कर्ज भरण्याइतके शेतकऱ्यांना शेतीतून आर्थिक उत्पन्न झालेले नाही. 2023 मध्ये देशात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी अशी परिस्थिती शेतकऱ्यांना शेती पिकातून योग्य परतावा मिळाला नाही. मागच्या वर्षीही कापूस आणि सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्यामुळे अपेक्षित भाव शेतकऱ्यांना मिळाला नाही.

खुशखबर! या 23 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टीचे 29 कोटी 25 लाख रुपये जमा; तुम्हाला आले का नाही?

तुर व हरभऱ्याच्या भावात तेजी आली होती मात्र या तेजीचाही शेतकऱ्यांना खूपच कमी प्रमाणात लाभ मिळाला आहे. त्याचबरोबर चालू हंगामात उत्पादन जास्त असूनही बाजारात दर कमी असल्यामुळे कापूस आणि सोयाबीनचे भाव खूपच घसरल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ते उत्पादन मिळाले नाही. सोयाबीनचा बाजार तर यंदा खूपच नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. सध्या बाजारात पिकांना मिळत असलेल्या बाजारभावातून उत्पादनातील खर्चही निघत नाही. मग शेतकऱ्यांनी आपले कर्ज कसे भरावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. यामुळे देखील शेतकऱ्यांची थकबाकी वाढली आहे. Farmer Loan Waiver

बँकेतील कर्ज थकल्यामुळे शेतकऱ्यांची अनेक बाजूने कोंडी होत आहे. नवीन कर्ज तर मिळणे शक्य नाही शेतकऱ्यांना मिळणारे इतर लाभ कर्ज खात्यात वळवले जात आहेत. हमीभावाने माल विकल्यानंतर खात्यात जमा होणारे पैसे ह कर्ज खात्यात वजा केले जात असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर होणे अतिशय आवश्यक बनले आहे. मात्र अर्थसंकल्पात याबाबत निर्णय होणार का नाही? याकडे राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

2 thoughts on “शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात कर्जमाफी जाहीर होणार का? शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा…”

Leave a Comment