Vidarbha Rain Alert : राज्यातील या भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता! भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज पाहिला का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vidarbha Rain Alert : राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची चिन्हं हवामान खात्याने स्पष्टपणे दिली आहेत. विदर्भात काही ठिकाणी ढग जमा होत असून हलकासा पावसाचा अंदाज आहे तर काही भागात उष्णतेने उकाडा वाढवला आहे. राज्यात उन्हाचा कडाका आणि दमट हवामान यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना आता काही भागात विजा आणि गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विशेषतः विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ, वर्धा, अकोला, अमरावती, गोंदिया हे जिल्हे आणि मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भाग या पावसाच्या किंवा उष्णतेच्या प्रभावाखाली राहतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. Vidarbha Rain Alert

भंडारा जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले असून आजच्या दिवशी विजा आणि गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. गडचिरोली, चंद्रपूर भागात शनिवार, रविवार आणि सोमवारी काही भागांत मध्यम पावसाचे चित्र दिसू शकते. हवामान खात्याने या भागात विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि काही ठिकाणी जोरदार वारे सुटण्याची शक्यता वर्तवली आहे. वाऱ्यांचा वेग ३० ते ४० किलोमीटर प्रतितासपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

शेती विषयक हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

यवतमाळ जिल्ह्यात आज आणि उद्या विजांसह हलकासा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वर्धा, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये देखील सोमवारी अशाच प्रकारचे हवामान पाहायला मिळेल. विजा आणि गडगडाटी ढगांसोबत हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात. यामुळे रात्रीच्या वेळी थोडाफार गारवा निर्माण होईल, मात्र दिवसा उकाडा कायम राहणार आहे. विशेष म्हणजे नागपूर सारख्या भागात सध्या कमाल तापमान ४० अंशांच्या आसपास पोहचले आहे.

पश्‍चिम महाराष्ट्राकडे वळालं तर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांत दमट हवामान आणि उष्णतेमुळे नागरिक त्रासिक झाले असून कोल्हापूर, सांगली, सोलापूर भागांत काही ठिकाणी विजा आणि गडगडाटासह हलक्या सरी पडू शकतात. सोलापूरमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. पुणे आणि अहिल्यानगर भागात हवामान पूर्णपणे दमट असून उकाड्याचा कडाका वाढत चालला आहे. अशा दमट हवामानामुळे वृद्ध, लहान मुले आणि ज्यांना दमा, रक्तदाब व हृदयविकारा सारखे आजार आहेत अशा लोकांनी विशेष काळजी घ्यावी असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

दरम्यान, अकोला जिल्ह्यात हवामान खात्याने थेट उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तीन दिवसांत अकोला भागात उष्णतेचा कहर राहण्याची शक्यता आहे. यावेळी तापमान ४३ अंशांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्यावे, उन्हात जाणे टाळावे आणि शरीर थंड ठेवण्यासाठी नैसर्गिक उपाय करावेत असं आरोग्य तज्ज्ञ सांगत आहेत. अमरावती जिल्ह्यात सोमवारी उष्णता आणि दमट हवामान राहील, गडचिरोली जिल्ह्यात देखील सोमवारी तसाच अंदाज आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी उष्ण हवामान असेल, यवतमाळ जिल्ह्यात मंगळवारी आणि बुधवारी उष्णतेने त्रास होऊ शकतो.

हवामानातील या बदलांमुळे शेती करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. ढगांचा गडगडाट आणि पावसाचा अंदाज लक्षात घेता काही भागांत जमीन ओली होण्याची शक्यता आहे. यामुळे कोरडवाहू पिकांची तयारी करत असलेल्या शेतकऱ्यांनी आत्ताच काही निर्णय घ्यावेत. दुसरीकडे जिथे उष्णतेचा प्रचंड प्रभाव राहणार आहे, तिथे पाणी साठवण आणि जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

राज्यातील हवामान गेल्या काही आठवड्यांपासून सतत बदलत आहे. एकीकडे काही भागांत वळीव पावसाच्या सरी कोसळत आहेत, तर दुसरीकडे उन्हाच्या झळांनी त्रस्त नागरिक थेट आजारी पडत आहेत. रस्त्यांवर गर्दी कमी झाली आहे, शाळकरी मुले आणि वृद्धांना उन्हाच्या वेळात घरातच थांबण्याचा सल्ला दिला जात आहे. शहरी भागात थोड्या फार प्रमाणात शीत गृहांची सुविधा मिळत असली तरी ग्रामीण भागात उकाडा अधिक जाणवत आहे. दिवसाचं तापमान अनेक जिल्ह्यांमध्ये ४० अंशाच्या आसपास पोहचत असल्याने जिवनावश्यक सेवा आणि शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजावरही याचा परिणाम जाणवतो आहे.

हवामान विभागाने दिलेला अलर्ट पाहता, नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील पाच दिवस वातावरण कधी ढगाळ तर कधी उष्णतेचा तडाखा देणारं असेल. यावेळी वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहील आणि त्यामुळे दमटपणा जाणवेल. दुसरीकडे पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या भागांत देखील हवामानात बदल जाणवेल. विजा चमकणार, गडगडाट होणार आणि काही भागात हलकासा पाऊस पडेल.

तसेच हवामान खात्याने स्पष्टपणे सांगितले आहे की, रात्रीचे तापमान काही भागांत कमी होऊ शकते मात्र दिवसा उन्हाचा कडाका कायम राहील. त्यामुळे कोणत्याही भागात अचानक पाऊस पडला तरी उन्हापासून बचावाची काळजी करणे गरजेचे आहे. यासोबतच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी उन्हात उभं राहणं टाळावं, डोक्यावर टोपी किंवा अंगावर पांढऱ्या रंगाचे सूती कपडे परिधान करावेत. ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो सकाळी १० नंतर आणि दुपारी ३ पर्यंत घराबाहेर पडू नये. ग्रामीण भागात हातपंप, विहिरीतील पाणी संपत चालले आहे त्यामुळे पाणी साठवणूक करून ठेवणं हे आता फारच गरजेचं ठरत आहे.

या हवामानाच्या बदलाने वीज पुरवठ्यावर सुद्धा काही भागात परिणाम झाला आहे. अचानक वारे वाहणं, विजा चमकणं यामुळे विद्युत वाहिन्यांवर ताण येत असून काही ठिकाणी विजेचा खेळ खंडोबा होतोय. त्यामुळे नागरिकांनी विजेचे उपकरण जपून वापरावेत. शाळा, महाविद्यालये व हॉस्पिटल्स यांनी आपली जनरेटर यंत्रणा सज्ज ठेवावी. हिवाळ्याच्या शेवटास काही भागांत पाऊस पडला म्हणून उन्हाळा थांबतो असे नाही, उलट यामुळे हवामान आणखीच विचित्र होत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

हे पण वाचा | आता राज्यात इतके दिवस अवकाळी पाऊस पडणार? पंजाब रावांचा नवीन अंदाज

1 thought on “Vidarbha Rain Alert : राज्यातील या भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता! भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज पाहिला का?”

Leave a Comment